SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सरनोबतवाडीत गॅरेजना आग... सुमारे पस्तीस लाखाचे नुकसानकोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या समन्वयासाठी पोलिस प्रशासन, महापालिका व‍ नियुक्त कर्मचा-यांचे प्रशिक्षण विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभानिमित्त उद्या ग्रंथदिंडी; ग्रंथमहोत्सवाचे होणार उद्घाटनसोलापूर येथील आंतरराष्ट्रीय रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत ऋषिकेश कबनुरकरचे यश ‘कॅमेरा तंत्र’वर उद्या मंगळवारी विद्यापीठात कार्यशाळापुन्हा एकदा जिल्हयासह राज्यात महायुतीला दणदणीत यश, विकासकेंद्रीत कामाला जनाधार : खासदार धनंजय महाडिकबुद्ध आणि बाबासाहेबांचे मानवतावादी तत्त्वज्ञान जग बदलाला मदत करणारे : पार्थ पोळके७६५ के.व्ही. पारेषण प्रकल्पासाठी 'महापारेषण' आणि 'महानिर्मिती'मध्ये सामंजस्य करारकोल्हापूर जिल्ह्यातील १३ नगरपालिकांमधील मतमोजणी प्रक्रिया शांततेत; विजय उमेदवारांच्या समर्थकांचा जल्लोष, नगरपालिका निकाल पुढील प्रमाणे...शिवाजी विद्यापीठात एमएसएमई व स्टार्टअप्ससाठी मार्गदर्शक संवाद सत्र

जाहिरात

 

बुद्ध आणि बाबासाहेबांचे मानवतावादी तत्त्वज्ञान जग बदलाला मदत करणारे : पार्थ पोळके

schedule21 Dec 25 person by visibility 167 categoryसामाजिक

▪️डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मानवतावाद आणि तथागत बुद्धांचा मानवतावाद या दोन ग्रंथांचे प्रकाशन

कोल्हापूर : मानवी समाजाचा इतिहास बदलाचा असून चांगल्या गोष्टी घडण्यासाठी अनेक बदल भारतीय जनमानसाने पाहिले आहेत. तथागत बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानवतावादी तत्त्वज्ञान जग बदलाला मदत करणारे आहे असे प्रतिपादन सातारचे ज्येष्ठ विद्रोही साहित्यिक व विचारवंत पार्थ पोळके यांनी केले.

ते निर्मिती प्रकाशन, प्रकाशित ज्येष्ठ लेखक आणि माजी सीमाशुल्क अधिकारी मदन पवार, लिखित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मानवतावाद आणि धम्म चळवळीच्या अभ्यासिका, अ‍ॅड. करुणा विमल, लिखित तथागत बुद्धांचा मानवतावाद या दोन महत्त्वपूर्ण वैचारिक ग्रंथाचा प्रकाशन समारंभ प्रसंगी राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर या ठिकाणी बोलत होते.

यावेळी न्यायाधीश टी. व्ही. नलावडे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मानवतावाद आणि तथागत बुद्धांचा मानवतावाद हे दोन्ही ग्रंथ मानवतावादी चळवळीला गती देणारे आहेत. त्यांचा मानवतावाद समजाला योग्य दिशा देणारा असून तो प्रत्येकांनी जोपासला पाहिजे.
कार्यक्रमांचे अध्यक्ष बहुजन साहित्य कला अकादमी, महाराष्ट्र राज्याचे सचिव संभाजी कांबळे म्हणाले, प्रत्येक संवेदनशील माणूस मानवतावादी असतो आणि प्रत्येक मानवतावादी क्रांतिकारी असतो. यावेळी प्राचार्य डॉ. डी. आर. भोसले, अनिल म्हमाने, कृष्णात पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.

डॉ. अमर कांबळे, सिद्धार्थ कांबळे, मधुकर शिर्के, आझाद नाईकवाडे, अनिता गायकवाड, राजेंद्र कोरे, सुनील जाधव, डॉ.  अनिल कवठेकर, संजयकुमार अर्दाळकर, सिद्धार्थ तामगावे, सूर्यकांत घाडगे, डी. वाय. पाटील, सूर्यकांत तोडकर, दिलीप पाटील यांच्यासह कोल्हापुरातील मानवतावादी लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

स्वागत व प्रास्ताविक अनिल म्हमाने यांनी केले. सूत्रसंचालन अभिजीत मासुर्लीकर यांनी तर आभार अंतिमा कोल्हापूरकर  मानले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id