SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
स्पर्धात्मक युगातील विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी ‘मानससूत्र’ उपक्रम; अध्यापकांना विशेष प्रशिक्षणशिक्षण महर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन अत्यंत दुःखद! ​खासदार धनंजय महाडिक यांची भावपूर्ण श्रद्धांजलीकोल्हापुरात 'राज्यपाल क्रीडा महोत्सव' व्हावा!देवस्थान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ द्या : आमदार यड्रावकर; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेऊन दिले निवेदनउच्च गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये उत्साहात प्रवेशमहापौरांचा 'जनता दरबार' ५ ऐवजी ११ ऑगस्ट रोजीशहरातील ड्रेनेजची कामे विहीत वेळेत पूर्ण करा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडश्रद्धांजली​"कर्मभूमीतील विद्यापीठाकडून झालेला सन्मान महत्त्वाचा," पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी व्यक्त केली होती कृतज्ञतासमाजकारण-राजकारणाचा कार्यतपस्वी आधारवड हरपला

जाहिरात

 

संसद मार्चवरील पोलीस कारवाईचे तीव्र पडसाद; राहुल गांधींकडून पंतप्रधान आणि दोन मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

schedule21 Jul 26 person by visibility 220 categoryदेश

नवी दिल्ली: कॉक्रोच जनता पक्षाच्या (CJP) वतीने संसदेवर काढण्यात आलेल्या 'चलो संसद' मार्चदरम्यान आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईचे तीव्र पडसाद उमटले आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे.

देशातील शिक्षण आणि परीक्षा प्रणालीमधील कथित गैरव्यवहाराविरोधात CJP च्या कार्यकर्त्यांनी काल संसदेवर मोर्चा काढला होता. यादरम्यान दिल्ली पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या संघर्षात अनेक जण जखमी झाले होते.
या कारवाईवर संताप व्यक्त करत राहुल गांधी म्हणाले की, "युवक आपल्या भविष्यासाठी आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर आवाज उठवत असताना सरकार पोलीस बळाचा वापर करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. देशातील परीक्षा प्रणाली पूर्णपणे कोलमडली असून ती वाळवीसारखी पोखरली गेली आहे."

तसेच, देशात एकीकडे उद्योगपतींच्या मुलांच्या विवाहांवर हजारो कोटी रुपये उधळले जात आहेत, तर दुसरीकडे सामान्य कुटुंबातील तरुणांना व्यवसायासाठी किंवा भविष्यासाठी साधी संधी मिळत नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. विद्यार्थ्यांच्या या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा ठपका ठेवत गांधींनी पंतप्रधान आणि दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्याची आक्रमक भूमिका घेतली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id