SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात 'राज्यपाल क्रीडा महोत्सव' व्हावा!देवस्थान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ द्या : आमदार यड्रावकर; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेऊन दिले निवेदनउच्च गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये उत्साहात प्रवेशमहापौरांचा 'जनता दरबार' ५ ऐवजी ११ ऑगस्ट रोजीशहरातील ड्रेनेजची कामे विहीत वेळेत पूर्ण करा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडश्रद्धांजली​"कर्मभूमीतील विद्यापीठाकडून झालेला सन्मान महत्त्वाचा," पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी व्यक्त केली होती कृतज्ञतासमाजकारण-राजकारणाचा कार्यतपस्वी आधारवड हरपलाडॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनामुळे शैक्षणिक महामेरू हरपला : कुलगुरू डॉ. राजनीश कामतज्ञानतपस्वी हरपले! शिक्षणमहर्षी, माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन

जाहिरात

 

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

schedule25 Jul 26 person by visibility 289 categoryदेश

नवी दिल्ली : दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. नीट (NEET-UG) परीक्षेतील कथित अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या वाढत्या रोषाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या निर्णयाची माहिती दिली. ३ मे २०२६ रोजी झालेल्या नीट-युजी परीक्षेत अनियमितता आढळल्यानंतर सरकारने तातडीने पावले उचलत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता आणि परीक्षा रद्द करून पुनर्परीक्षेची घोषणा केली होती. याशिवाय, पुढील वर्षापासून ही परीक्षा संगणक आधारित चाचणी (CBT) पद्धतीने घेण्याचा निर्णयही घेण्यात आला होता.
२१ जून २०२६ रोजी २0 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीत पार पडली आणि १६ जुलै रोजी निकालही जाहीर झाला. मात्र, गेल्या १० दिवसांत जंतरमंतरसह देशभरात पेटलेल्या आंदोलनामुळे आणि राष्ट्रविरोधी शक्तींकडून या परिस्थितीचा गैरफायदा घेतला जाऊ नये, तसेच विद्यार्थ्यांचे भविष्य कोलमडू नये म्हणून आपण नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  देशाच्या युवा पिढीच्या आकांक्षा आणि न्यायोचित अपेक्षांचा आपण आदर करत असल्याचे प्रधान यांनी म्हटले आहे. परीक्षा माफियांच्या विळख्यातून गुणवान विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी आणि त्यांच्या भविष्याशी खेळ होऊ नये म्हणून आपण कधीही पाठ फिरवली नसल्याचे धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्ट केले.
 या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी देशपातळीवर आक्रमक पवित्रा घेतला असून, बिहारसह अनेक भागांत तीव्र आंदोलने उसळली आहेत. राष्ट्रसेवा हीच आपल्या आयुष्याची सर्वोच्च प्राथमिकता असून, ओडिशाची जनता आणि देशाच्या तरुणांच्या विकासासाठी आपण पुढेही कटिबद्ध राहणार असल्याचे धर्मेंद्र प्रधान यांनी नमूद केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id