SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
धक्कादायक! सुरक्षिततेचे नियम धाब्यावर; आजऱ्यात भिंत कोसळून दोन निष्पाप जीव गेले!जागतिक संयुक्त राष्ट्र चिनी भाषा दिवस: संस्कृती आणि वारशाचा संगमकागलमधील बुद्धिबळ स्पर्धेत पार्थ, शिवम आणि ओजस विजेतेमहात्मा बसवेश्वर यांची जयंती मंत्रालयात साजरीपालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून महावितरणची 15.40 कोटींची कामे पुर्णशिवाजी विद्यापीठाच्या ‘सैफ’ केंद्राच्या कामगिरीचा केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून गौरवअक्षय्य तृतीया: साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ आणि मंगल सणडेटा सेंटर कंपन्यांना आवश्यक जागा त्वरित उपलब्ध करून द्यावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमित्राच्या खून प्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा; कोल्हापूर जिल्हा न्यायालयाचा निकाल20 ते 22 एप्रिल दरम्यान राज्यात वादळी पावसाची शक्यता

जाहिरात

 

इंधन साठा मुबलक; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचे देशभरात 'धाडसत्र'

schedule04 Apr 26 person by visibility 283 categoryदेश

 दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली परिस्थिती पाहता, केंद्र सरकारने देशातील इंधन आणि ऊर्जा सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. विविध मंत्रालयांच्या अधिकाऱ्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीनंतर, देशात एलपीजी (LPG), पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची ग्वाही देण्यात आली असून नागरिकांना कोणताही तुटवडा भासू नये यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
 
एलपीजी वितरण अधिक सुलभ करण्यासाठी सरकारने ५ किलोचे एफटीएल (Free Trade LPG) सिलेंडर सर्व वितरण केंद्रांवर उपलब्ध करून दिले आहेत. विशेष म्हणजे, या सिलेंडरसाठी कोणत्याही निवासी पुराव्याची (Address Proof) गरज नसून केवळ ओळखपत्र दाखवून ते मिळवता येईल.
 
 काल एकाच दिवसात देशभरात ७१ हजार एफटीएल सिलेंडरची विक्री झाली आहे. तसेच, गॅस आरक्षणासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त डिजिटल माध्यमांचा वापर करावा, असे आवाहनही मंत्रालयाने केले आहे.
 
देशातील शेती क्षेत्राला खतांचा तुटवडा भासू नये यासाठी सरकारने खत निर्मिती करणाऱ्या कारखान्यांना होणारा वायू पुरवठा ९० टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. यामुळे खतांचे उत्पादन विनाखंड सुरू राहून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
 
इंधनाची साठेबाजी आणि काळा बाजार करणाऱ्यांविरोधात सरकारने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सर्व राज्यांमध्ये प्रशासनाकडून तपासणी मोहीम राबवली जात असून, काल एका दिवसात देशभरात ३,७०० ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत.
 
नैसर्गिक वायूच्या वापराला गती देण्यासाठी सरकार पीएनजी (पाईप्ड नॅचरल गॅस) जोडणीवर भर देत आहे. मार्च महिन्यापासून आतापर्यंत देशभरात सुमारे साडेतीन लाख नवीन पीएनजी जोडण्यांना वायू पुरवठा सुरू करण्यात आला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id