SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
धक्कादायक! सुरक्षिततेचे नियम धाब्यावर; आजऱ्यात भिंत कोसळून दोन निष्पाप जीव गेले!जागतिक संयुक्त राष्ट्र चिनी भाषा दिवस: संस्कृती आणि वारशाचा संगमकागलमधील बुद्धिबळ स्पर्धेत पार्थ, शिवम आणि ओजस विजेतेमहात्मा बसवेश्वर यांची जयंती मंत्रालयात साजरीपालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून महावितरणची 15.40 कोटींची कामे पुर्णशिवाजी विद्यापीठाच्या ‘सैफ’ केंद्राच्या कामगिरीचा केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून गौरवअक्षय्य तृतीया: साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ आणि मंगल सणडेटा सेंटर कंपन्यांना आवश्यक जागा त्वरित उपलब्ध करून द्यावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमित्राच्या खून प्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा; कोल्हापूर जिल्हा न्यायालयाचा निकाल20 ते 22 एप्रिल दरम्यान राज्यात वादळी पावसाची शक्यता

जाहिरात

 

विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम: पंतप्रधान मोदींचा तृणमूलवर प्रहार, तर राहुल गांधींचे आसाममध्ये सभा

schedule05 Apr 26 person by visibility 298 categoryदेश

नवी दिल्ली : देशातील चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून दिग्गज नेत्यांच्या सभांनी राजकीय वातावरण तापले आहे. पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. कूचबिहार आणि अलीपुरद्वार येथील सभांमध्ये बोलताना त्यांनी सत्ताधारी पक्षावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यास सर्व घुसखोरांना हकलून देण्याची मोठी ग्वाही दिली.

 दुसरीकडे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुर्शिदाबाद येथील सभेतून भाजप आणि निवडणूक आयोगावर पलटवार करत, राज्यातील विकासकामांत अडथळे आणले जात असल्याचा आरोप केला. त्यांनी शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करण्याचे आश्वासनही दिले आहे.

दक्षिण भारतात केरळमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रोड शो आणि जाहीर सभांच्या माध्यमातून यूडीएफ (UDF) आणि एलडीएफ (LDF) या दोन्ही आघाड्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत केरळच्या उज्ज्वल भविष्यासाठी 'राजस्व' सरकारला निवडून देण्याचे आवाहन केले.

 त्याचवेळी आसाममध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सहा समुदायांना अनुसूचित जाती-जमातीचा दर्जा देण्याचे आणि चहा मळ्यातील कामगारांना दररोज ४५० रुपये मजुरी देण्याचे आश्वासन दिले आहे. 

दरम्यान, निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, पाचही राज्यांमध्ये मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी वापरली जाणारी ६५० कोटींहून अधिक किमतीची रोकड, दारू आणि अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, यात पश्चिम बंगाल ३१९ कोटींसह अव्वल स्थानावर आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id